YouTube व्हिडिओ

48. Mohemmad Rafi Vishesh | Dr Mrudula Dadhe

मोहम्मद रफींचं नाव घेतलं अन् त्यांची एकाहून एक सरस नि सुरस गाणी आठवली की सद्गुणांना सुगंधी स्वर लाभला होता असं वाटल्याशिवाय राहत नाही ! पुरुषी स्वर, पण त्याला होती जितकी ऐट तितकीच अदब..प्रेम, छेडछाड, प्रेमभंग, विफलता, उद्वेग, नटखटपणा, शुद्ध भक्ती आणि अशा असंख्य भावछटा, रफी-स्वरातून सारख्याच सहजपणे नि कुशलतेनं उमटल्या... रसिकांना नाना रसांच्या वर्षावात आजपर्यंत चिंब भिजवत राहिल्या.. म्हणून तर रफी ठरले नवरसांचे जादूगार ! संगीताच्या जाणकार नि प्रसिद्ध गायिका डॉ. मृदुला दाढे या पुस्तकात सांगतायत, रफींच्या आवाजातल्या जादूचं रहस्य! अन् त्यानंतर आहेत रफींची निवडक पंचवीस गाणी आणि त्यांचं रेशमी रसग्रह

47. नागरिकत्व दुरूस्ती कायद्याची सखोल ओळख | Sheshrao More

आपल्या संविधानाची सुरुवात आम्ही भारताचे लोक अशी आहे. भारतीय नागरिकत्वाचा मूळ कायदा काय आहे तसंच भारताच्या सहा शेजारी देशांमधील ठराविक व्यक्तींना भारताचे नागरिकत्व ज्या कायद्याने मिळू शकते, त्या नवीन कायदा नेमका कसा आहे, हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. या कायद्याच्या विविध पैलूंचा वेध घेणारे शेषराव मोरे लिखित नागरिकत्व दुरुस्ती कायदा घटनात्मकता व वास्तवता हे नवीन पुस्तक नुकतंच प्रकाशित झालंय.

46. What's the Future of Audio Podcasts in the wave of Video? | Marathi Podcast

न्यू मीडिया अर्थात नवीन माध्यमांचा विचार करता पॉडकास्टिंगनं गेल्या चार-पाच वर्षांत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. विश्वसंवाद हा मराठीतला पहिला पॉडकास्ट हा अमेरिकास्थित सॉफ्टवेअर व्यावसायिक मंदार कुलकर्णी यांनी २०१७ मध्ये सुरू केला. गेल्या आठ वर्षांत विश्वसंवाद पॉडकास्टवर येऊन काही पाहुण्यांशी झालेल्या गप्पांवर आधारित निवडक विश्वसंवाद हे पुस्तक राजहंसने प्रकाशित केलं आहे. पॉडकास्ट ते पुस्तक अशा माध्यमांतराचंही मराठीतलं पहिलंच उदाहरण ठरलेल्या या पुस्तकाविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.

45. Sonali Kulkarni | So Cool Take 2 |

Renowned actress and author Sonali Kulkarni talks extensively about her love for writing and how she crafted the book So Cool Take 2 in this special podcast with veteran journalist and editor of her book Alhad Godbole.

44. मराठी भाषा गौरव दिनाची राजहंसी भेट! | Dr. Sadanand Borse

३ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी ती भाषा किमान दीड ते दोन हजार वर्ष प्राचीन असायला हवी. त्या भाषेत समृद्ध ग्रंथ आणि साहित्य परंपरा असावी. हे साहित्य मूळ त्याच भाषेत लिहिलेलं असावं. अनुवादित नसावं. भाषेचा प्रवास अखंडित असावा आणि प्राचीन व सध्याच्या भाषेतील नातं सुस्पष्ट असावं. असे हे निकष आहेत. या पार्श्वभूमीवर यंदाचा मराठी भाषा गौरव दिन विशेष ठरणार आहे. यानिमित्तानं राजहंस प्रकाशनाचं मराठी साहित्यातील योगदानाविषयी राजहंस प्रकाशनाचे संपादक डॉ. सदानंद बोरसे यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.