
Astitvavad aani marathi kadambari | अस्तित्ववाद आणि मराठी कादंबरी
पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या इतिहासात अस्तित्ववादी विचारसरणाने क्रांतीच
घडविली. या घटनेचे श्रेय कीर्केगार्ड, नीत्शे, यास्पर्स, मार्सेल, हायडेगर,
काम्यू व सार्त्र यांच्याकडे जाते. अस्तित्ववादाने सुमारे चारेक दशके
पाश्चिमात्य जगतातील साहित्यनिर्मिती, समीक्षादृष्टी व कलाविचार यांवर
आपली कायमची मुद्रा उमटविली. दोन महायुध्दांच्या आसपासचे राजकीय-
सामाजिक वातवरण , स्तब्ध झालेला धर्मविचार, उद्ध्वस्त समाजमानस
आणि बेभरवशाचे व्यक्तिजीवन यांचा अस्तित्ववादाच्या उदयाशी व
विकासाशी जवळचा संबंध आहे. १९६० ते १९८० या कालावधीत
मराठी साहित्य व समीक्षा यांवरही अस्तित्ववादाचा प्रभाव होता.
रेखा इनामदार-साने यांनी 'अस्तित्ववाद आणि मराठी कादंबरी'
या ग्रंथामधून अस्तित्ववादाच्या उदयाशी तसेच जडणघडणीची नेटकी
मीमांसा केली आहे. तसेच आस्तिकता-नास्तिकता, निवडीचे स्वातंत्र्य,
परात्मता, असंगतता, अस्सल जीवनसरणी इत्यादी अस्तित्ववादी
आशयसूत्रांचा सप्रमाण उलगडा केला आहे. तत्वज्ञान आणि साहित्य
यांमधील परस्परसंबंधाची सूक्ष्म चिकित्सा करून मराठी कादंबरीविश्वात
मूलगामी परिवर्तन घडविणा-या 'कोसला', 'बॅरिस्टर अनिरूध्द
धोपेश्वरकर,' 'पुत्र', 'सात सक्कं त्रेचाळीस', 'एन्कीच्या राज्यात' या
कादंब-याचे अस्तित्ववादाशी असणारे नाते त्यांनी विश्लेषणपूर्वक स्पष्ट
केले आहे. अस्तित्ववाद आणि कादंबरी या दोहोंचे सांगोपांग विवरण
करणारा हा मराठीतील पहिला ग्रंथ आहे.
विलास खोले
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : सप्टेंबर २००४
- सद्य आवृत्ती : सप्टेंबर २०२४
- मुखपृष्ठ : सागर नेने
- राजहंस क्रमांक : I-03-2004